तर, याचे उत्तर नाही आणि हो असे दोन्ही आहेत.
कारण तुम्ही म्हणाल अमक्या एका व्यक्तीने लोकांचे वाईट करून खूप मोठी संपत्ती कमावली त्याचे कुठे काय वाकडे झाले. या एका वाक्यानेच लोकांचा इमानदारीवरील विश्वास उडत चालला आहे. परंतु मित्रानो, त्याचा अंत अजून बाकी आहे हे आपण विसरून जातो. त्याच्या पुढील आयुष्यात काय वाढून ठेवलाय हे फक्त काळच सांगू शकतो.
परंतु, चांगल्या वाईट कर्माची भरपाई तुम्हाला कधीतरी करावी लागतेच. असे आपले पूवर्ज म्हणून गेले. पण आता त्या शब्दांना काहीच अर्थ उरला नाही. खरतर आजकाल बरेच लोक तळतळाट, शाप, हळहळ या गोष्टींवर विश्वास करत नाही. असुद्या! वरील प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे का दिले त्याबद्दल आपण खालील दोन उदाहरणाद्वारे समजून घेऊ. आणि नंतर तुम्हीच ठरवा खरंच तळतळाट लागतो का नाही ते.
परंतु, चांगल्या वाईट कर्माची भरपाई तुम्हाला कधीतरी करावी लागतेच. असे आपले पूवर्ज म्हणून गेले. पण आता त्या शब्दांना काहीच अर्थ उरला नाही. खरतर आजकाल बरेच लोक तळतळाट, शाप, हळहळ या गोष्टींवर विश्वास करत नाही. असुद्या! वरील प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे का दिले त्याबद्दल आपण खालील दोन उदाहरणाद्वारे समजून घेऊ. आणि नंतर तुम्हीच ठरवा खरंच तळतळाट लागतो का नाही ते.
१. लाचखोर पोलिसवाले...
माझ्याकडे लायसेन्स, PUC, RC, हेल्मेट सर्वकाही असताना एका ट्रॅफिक पोलिसाने मला पकडून एक तास डोके लावले आणि शेवटी ५०० रुपये घेऊन त्याने मला सोडून दिले. कशाला थांबवले आणि कशाचे ५०० ते अजूनही कळले नाही. त्यानंतर एका पोलिसवाल्याने एका सर्टिफिकेट साठी माझी गरज ओळखून ५०० रुपये लाच घेतली. गरज नसताना द्यावी पण लागली. असे दिवसभर किती लोकांना हे पोलिसवाले फसवत असतील. आणि नंतर कितीतरी लोक त्यांना शिव्या-शाप देत असतील.हे रोज नवीन बकरे पकडतात ५००-१००० मागतात नाहीतर १०,००० चे चलन फाडायच्या आणि गाडी जप्त करण्याच्या धमक्या देतात. परंतु त्यांचे कधी वाईट होत नाही किंवा त्यांना कधी लोकांचा तळतळाट लागला नाही. असे आपण म्हणतो, आणि असे कर्म करायला आपल्याला एक कारण मिळून जाते. मग दुनिया चांगली नाही म्हणून आपणही असे वागायला लागतो.
ही बातमी वाचून प्रत्येकाला त्या मुलाचा राग आला असणार. आणि काहींनी त्याला शिव्या- शाप दिले असणार. कदाचित आपल्याला त्या वृद्ध जोडप्याची कहाणी ऐकून किंवा त्यांना झालेल्या यातना पाहून त्यांची कीव आली असणार, म्हणून आपण त्यांच्या मुलाला दोष दिला. परंतु आपण कधी त्या मुलाच्या वृद्ध आईवडिलांच्या कर्माचा विचार केला का? जर ते वृद्ध वरील उदाहरणातील पोलिसवाले असतील तर? आता तुमचे काय मत असणार त्यांच्याबद्दल?
आपण सर्वात मोठी चूक करत असतो ती म्हणजे- जीवनात अर्थ शोधत बसणे.
ज्या घटना जीवनात होतात त्या खूप साधारण असतात. होनी को कोण टाल सकता है अशा असतात.
जीवनात वाईट घटनांना महत्वच देऊन त्यात कारण शोधू नये, हेच आहे असं समजून लगेच पुढे चालत राहावे.
दुःख प्रत्येकाच्या जीवनात असतेच. परंतु, आपल्याला दुःख याचे नसते की आपण काय गमावले, दुःख याचे असते की अन्याय करणारा सुखी जीवन जगतो.
जीवनात कोणी तुम्हाला त्रास दिला तर वाईट भूतकाळ म्हणून सोडून द्या, कारण तुमच्यासोबत काही वाईट झाले असेल तर ते तुम्ही केलेल्या कर्माचे फळ समजा आणि नवीन मार्गाकडे बघा. काहीतरी वाईट होत असेल तर त्यात तुमचे हितच असणार. त्यामुळे चांगल्यात चांगलं करण्याचा विचार करा.
या जगात कुणाचे वाईट होत नसते, किंवा झाले तरी थोड्या वेळासाठीच होते, तळतळाट सारख्या गोष्टी माणूस आपले मन राखण्यासाठी करत असतो खरे तर असे काहीच नसते. कारण कोणाला शिव्या- शाप द्यायचा असेल तर आपणही त्या लायकीचे असायला पाहिजे.
जर कोणी अशिक्षित व्यक्तीचे पैसे हडप केले, तर त्या चोराला काय शिक्षा होईल किंवा त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करण्यापेक्षा साक्षीदाराने स्वत: गुन्हा रोखणे चांगले आहे. आज जर तुम्ही चोरासोबत राहून फायदा घेत असाल तर उद्या तुमचीही पाळी येऊ शकते. म्हणजे चोर तुम्हालाही इजा करू शकतो.
चोर किंवा लुटारूला देव काय शिक्षा देईल, हे आपल्या हयातीत बघायला मिळो किंवा न मिळो, पण भविष्यात प्रेक्षक बनण्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात काही प्रभावी आणि चांगली कामे केली तर बरे.
२. वृद्ध आईवडिलांना सोडून गेलेला मुलगा...
मागे एक बातमी वाचण्यात आली होती, एका मुलाने त्याच्या वृद्ध आईवडिलांना धुळेंच्या एस टी स्टॅन्ड वर सोडून दिले होते. आणि नंतर त्यांना कधीच घ्यायला आला नाही. अनेक दिवस त्या एस टी स्टॅन्ड वर मुलाची वाट पाहत घालवल्यानंतर काही लोकांनी त्यांना वृद्धआश्रमात पाठवले. आणि तिथे त्या वडिलांचा मृत्यू झाला. तरीही त्यांचा मुलगा त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास सुद्धा आला नाही.ही बातमी वाचून प्रत्येकाला त्या मुलाचा राग आला असणार. आणि काहींनी त्याला शिव्या- शाप दिले असणार. कदाचित आपल्याला त्या वृद्ध जोडप्याची कहाणी ऐकून किंवा त्यांना झालेल्या यातना पाहून त्यांची कीव आली असणार, म्हणून आपण त्यांच्या मुलाला दोष दिला. परंतु आपण कधी त्या मुलाच्या वृद्ध आईवडिलांच्या कर्माचा विचार केला का? जर ते वृद्ध वरील उदाहरणातील पोलिसवाले असतील तर? आता तुमचे काय मत असणार त्यांच्याबद्दल?
आपण सर्वात मोठी चूक करत असतो ती म्हणजे- जीवनात अर्थ शोधत बसणे.
ज्या घटना जीवनात होतात त्या खूप साधारण असतात. होनी को कोण टाल सकता है अशा असतात.
जीवनात वाईट घटनांना महत्वच देऊन त्यात कारण शोधू नये, हेच आहे असं समजून लगेच पुढे चालत राहावे.
दुःख प्रत्येकाच्या जीवनात असतेच. परंतु, आपल्याला दुःख याचे नसते की आपण काय गमावले, दुःख याचे असते की अन्याय करणारा सुखी जीवन जगतो.
जीवनात कोणी तुम्हाला त्रास दिला तर वाईट भूतकाळ म्हणून सोडून द्या, कारण तुमच्यासोबत काही वाईट झाले असेल तर ते तुम्ही केलेल्या कर्माचे फळ समजा आणि नवीन मार्गाकडे बघा. काहीतरी वाईट होत असेल तर त्यात तुमचे हितच असणार. त्यामुळे चांगल्यात चांगलं करण्याचा विचार करा.
या जगात कुणाचे वाईट होत नसते, किंवा झाले तरी थोड्या वेळासाठीच होते, तळतळाट सारख्या गोष्टी माणूस आपले मन राखण्यासाठी करत असतो खरे तर असे काहीच नसते. कारण कोणाला शिव्या- शाप द्यायचा असेल तर आपणही त्या लायकीचे असायला पाहिजे.
जर कोणी अशिक्षित व्यक्तीचे पैसे हडप केले, तर त्या चोराला काय शिक्षा होईल किंवा त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करण्यापेक्षा साक्षीदाराने स्वत: गुन्हा रोखणे चांगले आहे. आज जर तुम्ही चोरासोबत राहून फायदा घेत असाल तर उद्या तुमचीही पाळी येऊ शकते. म्हणजे चोर तुम्हालाही इजा करू शकतो.
चोर किंवा लुटारूला देव काय शिक्षा देईल, हे आपल्या हयातीत बघायला मिळो किंवा न मिळो, पण भविष्यात प्रेक्षक बनण्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात काही प्रभावी आणि चांगली कामे केली तर बरे.
वरील उदाहरणात पोलिसवाल्यांचे नाव फक्त उदाहरणासाठी घेतले आहे. कृपया त्यांनी मनाला लावून घेऊ नये. कारण असे लोक सर्वच क्षेत्रात असतात.
तसेच आपल्याला दैनंदिन जीवनात आपले व्यवहार करतांना काही छोट्या मोठ्या फसवणुकीना सामोरे जावे लागते. यासाठी आम्ही एक लेखमालिका चालू करत आहोत. ज्यामध्ये आपल्यासोबत किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घोटाळ्यांची तसेच फसवणुकीची माहिती देण्यात येईल, आणि त्यापासून आपला बचाव कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.
या घोटाळ्यामध्ये आर्थिक, व्यावसायिक, राजकीय, ऑनलाईन, सामाजिक घोटाळे किंवा फसवणुकींबद्दल माहिती देण्यात येईल. रोज नवीन फसवणूक व घोटाळ्यांबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकता.