आजकाल ऑनलाइन फसवणुकीच्या कोणत्या पद्धती सहजपणे वापरून लोकांना फसवले जाते?
जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत आहे, तसतसे लोकांना फसवणे अधिक सोपे झाले आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. कारण इथे इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवणे अधिक सोपे झाले आहे. आजकाल प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहेत आणि त्यामध्ये इंटरनेट नसेल तर नवलच!आज कोणत्याही अडचणीसाठी आपण आधी मोबाइलमध्ये शोधाशोध करतो. तसेच आपले स्वतःचे दैनंदिन अपडेट्स सोशल मीडियाद्वारे इतरांना सांगत असतो. याच गोष्टींचा फायदा घेऊन फसवणूक करणारे लोक आपल्याला टार्गेट करतात. आणि आपली फसवणूक केल्या जाते. अशा फसवणुकीसाठी आपण स्वतःच कारणीभूत असतो याची आपल्याला थोडीशी भनक सुद्धा लागत नाही.
अशाच टार्गेट करून फसवणूक झालेल्या दोन व्यक्तींचे अनुभव इथे शेयर करतो. ज्यामुळे आपल्याला कल्पना येईल कि, सुशिक्षित लोकांना सुद्धा कसं टार्गेट करून फसवल्या जाते.
KYC करा नाहीतर तुमचे खाते बंद होईल...
बायको- "अहो, काय करताय?" शक्य तेवढ्या प्रेमळ स्वरात सौ ने मला फोनवर विचारलं.मी- "काय चुकलं ते पटकन सांग?"
बायको- "तुम्ही चिडणार नसाल तर सांगते"
मी- "म्हणजे मी चिडणार असं काम केलं हे तुला माहीत आहे."
बायको- "अहो ऐका ना? डेबिट कार्ड चे डिटेल्स सांगायचे नसतात ना?'
मी- "नाही, कधीच नाही"
आता मला मात्र रास्त शंका आली आणि त्यामुळे ताप चढायला लागला.
बायको- "बँकेतल्या माणसाला?"
मी- "बँकेतील माणसं यासाठी फोन करत नाहीत."
बायको- "पण तो तर म्हणाला बँकेतल्या माणसाला सांगितले तर हरकत नसते म्हणून" असे म्हणून सौ ने काकुळतिच्या स्वरात चूक कबूल केली.
काय झालं याची मला पूर्ण कल्पना आली. आणि शक्य तेवढ्या प्रेमळ स्वरात कार्ड ब्लॉक करण्यासाठी तिला सांगितलं.
सौ अहमदनगर जिल्ह्यात नोकरी ला असतांना तिचं स्टेट बँकेत पगाराचे खाते होते आणि छ.संभाजीनगर येथे आल्यावर ते अन्य बँकेत उघडले.
त्यामुळे त्या जुन्या खात्यात व्यवहार होत नसत. परिणामी ते खाते बँकेकडून बंद करण्यात आले होते पण याची सौ ला कल्पना नव्हती.
घटनेच्या दिवशी सौ ला फोन आला की ते भामटे अहमदनगर च्या स्टेट बँकेतून बोलत असून सौ चे KYC करायचे असून आपला आधार कार्ड क्रमांक सांगितल्यास त्यांना खाते अद्यावत (update) करता येईल तसेच ATM कार्ड सुद्धा जुने असल्याने ते अद्यावत करण्यासाठी कार्ड क्रमांक व cvv क्रमांक सांगितल्यास कार्ड सुद्धा आपोआप अद्यावत होऊन जाईल म्हणून सांगितले.
तत्पूर्वी मी सौ ला बरेचदा कार्ड डिटेल्स कुणालाही सांगायचे नसतात म्हणून तंबी दिली होती. त्यामुळे तिने यांपैकी काहीही सांगण्यास नकार दिला.
तेव्हा समोरच्या व्यक्तीने तो शाखा व्यवस्थापक असून हा तपशील न सांगितल्यास खाते व ATM कार्ड बंद होईल व ते सुरू करण्यासाठी आपणास प्रत्यक्षात शाखेत यावं लागेल म्हणून सांगितले.
सौ ला सुद्धा सुटी काढून नगरला जाणे त्रासदायक वाटल्याने व त्या व्यक्तीने तिचा विश्वास संपादन केल्याने तिने सर्व तपशील सांगितला होता.
थोडक्यात बँकेतील जबाबदार व्यक्ती बोलत असल्याचे भासवून तसेच भविष्यात होऊ शकणारा त्रास भासवून सौ ची फसवणूक केली होती.
मात्र आमचं नशीब बलवत्तर ठरलं.
कारण दुसऱ्याच दिवशी आम्ही नगर च्या स्टेट बँकेत गेलो असता सौ चे खाते बरेच दिवसांपासुन बंद झाले असल्याने तिचे ATM कार्ड सुद्धा पूर्वीच ब्लॉक केले गेले होते.
आणि म्हणूनच तीनदा प्रयत्न करूनही त्या भामट्यांना आदल्या दिवशी एक रुपया ही काढता आला नव्हता. आणि अश्या प्रकारे सौ चे कष्टाचे पैसे वाचले.
त्यानंतर आम्ही ते खाते पुन्हा चालू करून त्यातील शिल्लक पैसे काढून घेऊन खाते कायमचे बंद केले.
हॉटेलच्या बुकिंग साठी फसवणूक...
माझा एक डॉक्टर मित्र आहे.२०२२ च्या शेवटी त्याने कुटुंबासह गुजरात टूर करण्याचे ठरवले.
त्यासाठी त्याने हॉटेल ची चौकशी करण्यासाठी गुगल वर शोध घेतला.
असंच एकदा एक्स हॉटेल मधून बोलत असल्याचे सांगून एकाने त्याला हॉटेल विषयी व ईतर सुविधा विषयी सविस्तर माहिती दिली.
ईतर सुविधेमध्ये चारचाकी ची सुविधा सुद्धा देऊ केली. ही डील आवडल्याने मित्राने ₹ २५००० रकमेला होकार दिला.
पण त्या व्यक्तीने बुकिंग करण्यासाठी ₹ १५,००० आधी व उर्वरीत ₹ १०,००० हे २४ तास आधी जमा करण्यास सांगितले, जेणेकरून त्याला रूम व चारचाकी बुक करणे सोयीचे ठरेल.
मित्राने १५,००० गुगल पे ने भरले.
त्याची त्याने पावती दिली व त्यावर हॉटेल चे नाव व खोली क्रमांक नमूद केले होते.
प्रत्यक्ष जायच्या आधी उर्वरीत ₹ १०,००० भरण्यासाठी त्याने फोन केला, मित्राने सुद्धा ₹ १०,००० भरले व प्रत्यक्ष निघण्याची तयारी सुरू केली.
एव्हाना त्या दोघांचा व्हाट्सअप्प वर नियमित वार्तालाप सुरू होता. म्हणून मित्राने निघण्याच्या काही वेळ आधी व्हाट्सअप्प वर संदेश पाठवला पण तो वाचला गेला नाही, म्हणून फोन केला तर फोन बंद होता.
परत काही वेळाने फोन केला, तरीही फोन बंद.
मित्राच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
त्याने सतत फोन केले मात्र फोन बंद, व्हाट्सअप्प सुद्धा बंद.
मात्र तिकिटे काढली असल्याने तो गुजरात ला त्या शहरात जाऊन त्या लोकेशनला पोचला असता तिथे त्या तथाकथित हॉटेल च्या नावाने टपरीवजा अगदी छोटेसे हॉटेल होते.
मित्राला सर्व प्रकार समजला. त्याची ₹२५,००० ने फसवणूक झाली होती.
तिथे त्याने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण पुरावा काही नसल्याने तो निष्फळ ठरला. तसेच दुसऱ्या राज्यात कुटुंबासह अश्या गोष्टी करणं अवघडच जाते.
थोडक्यात...
वरील दोन्ही घटनेत भामट्यांनी वेगवेगळी शक्कल लढवली होती आणि ती बेमालूमपणे पूर्णत्वास नेली होती. पहिल्या प्रकरणात जरी अयशस्वी राहिले तरी, त्यांचा बँकेचे तपशील घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला होता. त्यामुळे बॅंकेतील कामकाज असल्याचे बतावणी करून व हॉटेल बुकिंग च्या माध्यमातून हे लोक फसवणूक करत असतात.
आता सर्वात महत्वाचे म्हणजे या दोन्ही प्रकरणात फसवणूक करणाऱ्या टोळीला कसे कळले की, या दोन्ही व्यक्तींची गरज काय आहे? त्यांना कसे कळले की, पहिल्या उदाहरणातील व्यक्तीचे स्टेट बँकेत खाते आहे. आणि दुसरा व्यक्ती हॉटेल बुकिंगसाठी शोध करत आहे ते?
आता समजा पहिल्या प्रकरणात आपण समजून घेऊ कि प्रत्येकाचे स्टेट बँकेत खाते असतेच असते. मात्र दुसऱ्या प्रकरणात त्या व्यक्तीला हॉटेल ची गरज आहे. हे कसे कळले असेल?
याला कारणीभूत आहे आपले सोशल मीडिया स्टेटस, आपण इंटरनेट वर काय सर्च करतो, कशासाठी सर्च करतो हे सुद्धा यासाठी कारणीभूत असते. फसवणूक करणारे तुम्हाला एका दिवसात टार्गेट करून फसवत नसतात, तर त्यासाठी बऱ्याच दिवसापासून तुमच्यावर लक्ष ठेवल्या जाते. ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते.
आता तुम्ही म्हणाल आमच्यावर कोण कसे लक्ष ठेवणार? तर बघा त्यासाठी आणखी एक उदाहरण देतो.
समजा, एखाद्या व्यक्तीने नवीन कार घेतली. आता नवीन कोणतीही वस्तू घेतल्यावर तुम्ही त्याचे स्टेटस ठेवणार नाही असे कसे होईल. सोशल मीडिया मुळे मग ही गोष्ट फसवणूक करणाऱ्या टोळीच्या निदर्शनास येते. आणि मग तिथून तुमच्यावर लक्ष ठेवल्या जाते. कारण त्यांना माहित असतेच नवी कार घेतल्यावर तुम्ही देवदर्शनाला जाणारच.
आणि त्यासाठी तुम्ही काय काय सर्च करू शकता. मग तुमच्या गरजा काय काय असू शकतात. यावरून तुम्हाला कसे फसवायचे यावर प्लॅन बनवल्या जातो, आणि तुम्हाला फसवल्या जाते. तुम्हाला वाटते मी हॉटेल बुकिंग साठी शोधत होतो त्यामुळेच त्यांचा कॉल आला असणार, माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये मी बऱ्याच दिवसापासून व्यवहार केले नाही त्यामुळे बँकेतून कॉल आला असणार. त्यामुळे आपण त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतो आणि त्यांचे शिकार होतो.
हे फक्त उदाहरणासाठी दिले आहे. मात्र अशा नवीन नवीन गोष्टीवरून योजना बनवून आपली फसवणूक केल्या जाते. महत्वाचे म्हणजे यात फसवणूक झालेल्या लोकांमध्ये सुशिक्षित लोकांचा खूप मोठा आकडा आहे.
आता सर्वात महत्वाचे म्हणजे या दोन्ही प्रकरणात फसवणूक करणाऱ्या टोळीला कसे कळले की, या दोन्ही व्यक्तींची गरज काय आहे? त्यांना कसे कळले की, पहिल्या उदाहरणातील व्यक्तीचे स्टेट बँकेत खाते आहे. आणि दुसरा व्यक्ती हॉटेल बुकिंगसाठी शोध करत आहे ते?
आता समजा पहिल्या प्रकरणात आपण समजून घेऊ कि प्रत्येकाचे स्टेट बँकेत खाते असतेच असते. मात्र दुसऱ्या प्रकरणात त्या व्यक्तीला हॉटेल ची गरज आहे. हे कसे कळले असेल?
याला कारणीभूत आहे आपले सोशल मीडिया स्टेटस, आपण इंटरनेट वर काय सर्च करतो, कशासाठी सर्च करतो हे सुद्धा यासाठी कारणीभूत असते. फसवणूक करणारे तुम्हाला एका दिवसात टार्गेट करून फसवत नसतात, तर त्यासाठी बऱ्याच दिवसापासून तुमच्यावर लक्ष ठेवल्या जाते. ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते.
आता तुम्ही म्हणाल आमच्यावर कोण कसे लक्ष ठेवणार? तर बघा त्यासाठी आणखी एक उदाहरण देतो.
समजा, एखाद्या व्यक्तीने नवीन कार घेतली. आता नवीन कोणतीही वस्तू घेतल्यावर तुम्ही त्याचे स्टेटस ठेवणार नाही असे कसे होईल. सोशल मीडिया मुळे मग ही गोष्ट फसवणूक करणाऱ्या टोळीच्या निदर्शनास येते. आणि मग तिथून तुमच्यावर लक्ष ठेवल्या जाते. कारण त्यांना माहित असतेच नवी कार घेतल्यावर तुम्ही देवदर्शनाला जाणारच.
आणि त्यासाठी तुम्ही काय काय सर्च करू शकता. मग तुमच्या गरजा काय काय असू शकतात. यावरून तुम्हाला कसे फसवायचे यावर प्लॅन बनवल्या जातो, आणि तुम्हाला फसवल्या जाते. तुम्हाला वाटते मी हॉटेल बुकिंग साठी शोधत होतो त्यामुळेच त्यांचा कॉल आला असणार, माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये मी बऱ्याच दिवसापासून व्यवहार केले नाही त्यामुळे बँकेतून कॉल आला असणार. त्यामुळे आपण त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतो आणि त्यांचे शिकार होतो.
हे फक्त उदाहरणासाठी दिले आहे. मात्र अशा नवीन नवीन गोष्टीवरून योजना बनवून आपली फसवणूक केल्या जाते. महत्वाचे म्हणजे यात फसवणूक झालेल्या लोकांमध्ये सुशिक्षित लोकांचा खूप मोठा आकडा आहे.
अशाच फसवणुकीच्या नवीन सत्य घटना जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्स अँप ग्रुपमध्ये सहभागी व्हा!